दसरा सणाचे महत्व व दसरा सणाची माहिती मराठी मध्ये

nandkishor
दसरा (विजयादशमी) हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला सण आहे.

चला तर मंडळी जाणून घेऊया दसरा सणाचे महत्व,दसरा सणाची संपूर्ण माहिती मराठीत

दसरा (विजयादशमी) म्हणजेच ‘आश्विन शुद्ध दशमी’ हा दिवस ‘दसरा’ म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे ‘नवरात्र’ साजरे केले जातात आणि दहाव्या दिवशी दसरा (विजयादशमी) साजरा करतात.

{tocify} $title={Table of Contents}

दसरा सणाचे महत्व आणि संपूर्ण माहिती 

"दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा" या काव्यामध्ये दसरा सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात जागृत करणारा दसरा
दसरा सणाची माहिती व महत्व


दसरा सणाचे दुसरे नाव विजयादशमी आहे.
 अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.

दसरा ह्या सणांचे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने स्वागत होते. ह्या सणांचा दिवस म्हणजे साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वस्तू खरेदी करतात, नवे करार करतात, नव्या योजनांच्या प्रारंभ करतात इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात.

ह्या दिवशी घरोघरी जेवणामध्ये चांगले पदार्थ बनविण्याचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.

या दिवशी सिमोल्लंघन, सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन देखील केले जाते. शेतकरी बांधव आपल्या अवजारांची पूजन करतात.आणि विद्यार्थी स्वतःच्या पुस्तकाचे पूजन करतात.

सायंकाळी गावाबाहेर जातात आणि आपल्या गावाची सीमा ओलांडायची. आपटयाचे आणि शमीचे पुजन करायचे त्या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तीला विजयाकरता वर मागायचा.

श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती 

दसरा सणाचे महत्व,दसरा सणाची संपूर्ण माहिती मराठीत

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . 

दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. 

या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.

 दसऱ्याला आपट्याच्या पानांचे महत्त्व


दसरा सणाचे महत्व,दसरा सणाची संपूर्ण माहिती मराठीत
 दश-हरा' म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला 'विजयादशमी' असेही म्हणतात. दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. आपट्याच्या पानांचे महत्त्व येथे देत आहोत.

सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.

मंडळी आशा करतो की दसरा सणाचे महत्व,दसरा सणाची संपूर्ण माहिती मराठीत हा लेख आवडला असेल !

या लेखामध्ये माहितीची काही कमतरता असेल तर टिपणी करा!

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×